ठाण्यासह कळवा, मुंब्रा दिव्यातही पाणीसंकट
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २० : महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतील पिसे उदंचन केंद्र आणि टेमघर जलशुद्धीकरण केंद्र पावसाळ्यापूर्वीच्या कामांसाठी बुधवारी (ता. २१) १२ तासांसाठी वितरण बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यापाठोपाठ आता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातही देखभाल-दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवारी (ता. २२) दुपारी १२ वाजल्यापासून शुक्रवारी (ता. २३) दुपारी १२ वाजेपर्यंत २४ तासांसाठी काटई ते ठाणेदरम्यान पाणीपुरवठा बंद राहील. त्यामुळे ठाणे पालिका क्षेत्रात पाणीबाणी निर्माण होणार आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात अत्यंत महत्त्वाचे देखभाल-दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे गुरुवार दुपारपासून शुक्रवार दुपारपर्यंत २४ तासांसाठी काटई ते ठाणे यादरम्यान पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दिवा, मुंब्रा, कळवा या प्रभाग समितीतील सर्व भाग, तसेच वागळे प्रभाग समितीतील रुपादेवी पाडा, किसन नगर क्र. २, नेहरू नगर आणि मानपाडा प्रभाग समितीतील कोलशेत खालचा गाव येथील पाणीपुरवठा पूर्ण बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी दुपारी पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर काही काळ कमी दाबाने वितरण होणार आहे. नागरिकांनी आवश्यक तो पाणीसाठा करून ठेवावा. तसेच काटकसरीने पाणी वापरून अपव्यय टाळावा, असे महापालिकेने आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.