गटारातील काढलेला गाळ लवकर हटवा
नेरूळ, ता. २४ (बातमीदार) : पावसाळापूर्व कामाचा भाग म्हणून महापालिका प्रशासनाकडून नेरूळ सेक्टर ६ परिसरात गटारातील माती, अडकलेला कचरा, गाळ काढण्याचे काम सुरू आहे. तथापि गटारातील गाळ, कचरा, माती काढल्यावर त्याचे गटारालगतच रचलेले ढिगारे पाच-सहा दिवसानंतरही हटविण्याची तत्परता दाखविली जात नाही. त्यामुळे पावसामध्ये ती माती, गाळ पुन्हा गटारामध्ये वाहून जात आहे. गटारातील कचरा बाहेर काढून ठेवल्याने त्याचा दुर्गंधीचा त्रास स्थानिक नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्या दुर्गंधीतूनच ये-जा करावी लागत आहे. त्यातच समाजमंदिर ते मासळी बाजार रस्ता हा सर्वाधिक वर्दळीचा भाग असून, त्या मार्गावर दुकानासमोरच हे कचऱ्याचे ढिगारे आहेत. त्यामुळे कचऱ्याच्या दुर्गंधीने नागरिक त्रस्त झाले आहेत. गाळ काढून सहा दिवस उलटूनही हे ढिगारे हटविले गेले नाहीत. मातीचे ढिगारे तातडीने हटविण्याचे संबंधितांना निर्देश देण्याची मागणी संदीप खांडगे पाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.