पावसाळ्यात घोडबंदर तुंबण्याची धास्ती

पावसाळ्यात घोडबंदर तुंबण्याची धास्ती
Published on

पावसाळ्यात घोडबंदर तुंबण्याची धास्ती
ठाणे महापालिकेने पथक तयार; अधिकारी ठेवणार लक्ष
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २४ : घोडबंदर भागात मोठ्या प्रमाणात एमएमआरडीए, एमएसआरडीसी, मेट्रो आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची कामे सुरू आहेत. ही कामे करताना ड्रेनेज लाइन व कल्व्हर्ट बदलण्यात आले आहे. त्यामुळे यंदा घोडबंदर रोड पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. याची धास्ती घेत पालिका प्रशासनाने कापूरबावडी ते गायमुखपर्यंतच्या दोन्ही मार्गिकांवर पाणी साचू नये, यावर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेच्या सात अभियंत्यांची नेमणूक केल्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी काढले आहेत. तसेच पावसाळ्यात कर्तव्यात कसूर केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारादेखील पालिका प्रशासनाने दिला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातून मुंबई-नाशिक आणि घोडबंदर मार्गे वसई गुजरातच्या दिशेने महामार्ग जात आहे. त्यामुळे या मार्गावरून हलक्या वाहनांसह अवजड वाहनांचीदेखील वर्दळ सुरू असते. तसेच उड्डाणपुलावर जड व अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. त्यामुळे येथील रस्ते, उड्डाणपूल वारंवार नादुरुस्त होतात. त्यामुळे वाहतूक कोंडीतही भर पडत असते, अशा वेळेस अपघातदेखील होण्याची शक्यता असते. घोडबंदर भागात सध्या सेवा रस्त्याचे मुख्य रस्त्यात विलीनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामामध्ये अनेक ठिकाणी मुख्य रस्ता व सेवा रस्त्यामधील स्टॉर्म वॉटर ड्रेन तोडण्यात आल्याचा दावा महापालिकेने केला.

रस्त्याच्या सीमारेषेवर नवीन स्टॉर्म वॉटर ड्रेनचे बांधकाम करण्यात येत आहे, परंतु अस्तित्वातील स्टॉर्म वॉटर ड्रेन व नवीन स्टॉर्म वॉटर ड्रेन जोडलेले नाहीत. त्यामुळे पावसाळ्यादरम्यान पाण्याचा निचरा होणार नसल्याचेदेखील पालिकेचे म्हणणे आहे. त्यामुळे घोडबंदर रस्त्यावर पाणीचा पाणी साचण्याची शक्यता नाकारता येत नाही. याची दक्षता घेत, पालिका प्रशासनाने कापूरबावडी ते गायमुखपर्यंतच्या दोन्ही मार्गिकांवर पाणी साचू नये, यावर लक्ष ठेवण्यासाठी पालिकेच्या सात अभियंत्यांची नेमणूक केली आहे.

उपअभियंता व कनिष्ठ अभियंता रस्त्याची जबाबदारी
* कापूरबावडी ते पातळीपाडा फ्लायओव्हर (दोन्ही बाजू)च्या ३.४० किमी अंतराच्या रस्त्यावर पाणी साचू नये, यासाठी त्याची जबाबदारी दत्ता शिंदे, प्रशांत कलगुटकर यांच्याकडे देण्यात आली आहे.
* पातलीपाडा फ्लायओव्हर ते ओवला नाका (दोन्ही बाजू) ३.५० किमी अंतर रस्त्याची जबाबदारी किशोर गोळे, प्रवीण करडी यांच्याकडे आहे.
* ओवळा नाका ते गायमुख (दोन्ही बाजू) ३.०० च्या रस्त्याची जबाबदारी विजय भोई, निशांत पवार आणि शशिकांत भोईर यांच्याकडे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com