पर्यावरणाचा समतोल ढसाळला तर मानवी विनाश अटळ

पर्यावरणाचा समतोल ढसाळला तर मानवी विनाश अटळ

Published on

विरार, ता. २५ (बातमीदार) : जगभरात हवामान बदलावर गंभीर चर्चा सुरू आहे. ऋतूचक्रच बदलत आहे. वाढती उष्णता मानवाबरोबरच पशु-पक्षी यांच्या जीवावर उठत आहे. निसर्गावर मानवी हस्तपेक्ष असाच सुरू राहिल्यास निसर्ग बदलाचे विघातक परिणाम आपल्या जीवावर बेतू शकते, असे स्पष्ट मत आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ सोमय्या दत्ता यांनी व्यक्त केले.

हवामान बदल व त्यास सामोरे कसे जावे, याबाबत निर्मळ, वसई येथे दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. समाजसेवा मंडळ, उत्तर वसई, पर्यावरण संवर्धन समिती, युवा संस्था व एनएपीएम यांनी आयोजित केलेल्या दोनदिवसीय प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते. हवामान बदल यावर फक्त चर्चा करून व १० ते १५ झाडे लावून हा प्रश्न सुटणार नाही. आज परिस्थिती आपल्या हाताबाहेर जात आहे. कोळसा, तेल यांचा वापर थांबवून पर्यायी ऊर्जा तंत्रज्ञान वापरू शकलो नाही, तर यापुढे पृथ्वीचे तापमान रोखणे मानवाच्या आवाक्याबाहेर असेल. त्यामुळे प्रभावी उपाययोजना करून लोकल तो ग्लोबल अशी रणनीती तयार करावी लागेल, असे मत दत्ता यांनी व्यक्त केले. या प्रशिक्षण शिबिरात वसईतील युवक सहभागी झाले होते. प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी दानिया डाबरे, सुजय मोरे, गीता डाबरे, अंशू मोर्य यांनी मेहनत घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com