तळोजा भुयारी मार्गात पाच फूट पाणी
खारघर, ता. २६ (बातमीदार) : तळोजा भुयारी मार्गात पाच फुटापर्यंत पावसाचे पाणी तुंबल्यामुळे रहिवाशांना तीन किलोमीटर अंतर पार करून पेंधर रेल्वे फाटक मार्गावरून ये-जा करावे लागली. त्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली होती.
तळोजा फेज - १ व २ वसाहत तसेच घोट, तळोजा मजकूर आदी गावांतील नागरिकांना पनवेल, खारघर, नवी मुंबई आणि मुंब्रा परिसरात ये-जा करता यावी, यासाठी सिडको आणि रेल्वे प्रशासनाने दिवा, पनवेल, तळोजा रेल्वे फाटकाशेजारी भुयारी मार्ग तयार करण्यात आले आहेत. भुयारी मार्गातील पाण्याचा निचरा करण्यासाठी रेल्वेने २५ आणि ५० अश्वशक्तीचे पंप तसेच वीजपुरवठा खंडित झाल्यास २०० केव्ही जनरेटरची सोय केली आहे. दरम्यान, हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज वर्तविला जात असल्यामुळे भुयारी मार्गातून निचरा होणाऱ्या गटाराची साफसफाई करणे तसेच मोटार पंप सुस्थितीत ठेवणे आवश्यक होते; मात्र त्याकडे रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे पहिल्याच पावसात भुयारी मार्गात जवळपास पाच फुटांपर्यंत पाणी भरले होते. तुंबलेल्या पाण्यातून वाहने घेऊन जाताना वाहनांच्या इंजिनमध्ये पाणी गेल्यामुळे काही वाहने भुयारी मार्गात बंद पडली होते. भुयारी मार्गात तुडुंब पाणी भरल्यामुळे नागरिकांना तीन किलोमीटर अंतर पार करून पेंधर रेल्वे फाटकमार्गे ये-जा करावी लागली. वाहतूक कोंडी होऊन तळोजावासीयांचे हाल झाल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.