अवकाळीमुळे २७००. ४७ हेक्टरवरील लागवडीचे नुकसान

अवकाळीमुळे २७००. ४७ हेक्टरवरील लागवडीचे नुकसान

Published on

७००.४७ हेक्टर लागवडीचे नुकसान
अवकाळीमुळे शेती, बागायतीवर पाणी
वसई, ता. २६ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. हातातोंडाशी आलेले पीक वाहून गेले आहे. यात आंबा, चिकू, उन्हाळी भात तसेच भाजीपाला लागवडीचे नुकसान झाले. याचा पंचनामा हा जिल्हा कृषी विभागाकडून करण्यात आला आहे. यात एकूण २,७०० हेक्टरपेक्षा अधिक जमिनीचे क्षेत्र व नऊ कोटींहून जास्त नुकसान झाल्याचे म्हटले आहे. याबाबत शासनाकडे अहवाल सादर करण्यात आला आहे.

अवकाळी पावसाची अवकृपा पालघर जिल्ह्यावर झाली. या वेळी घरांसह बागायत क्षेत्र, मच्छीमारांच्या बोटी, वीज यंत्रणा कचाट्यात सापडली. जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड यांनी त्वरित याकडे लक्ष देत तसे निर्देश संबंधित विभागांना देऊन पाहणीदेखील केली. पालघर जिल्हा हा आदिवासीबहुल क्षेत्र आहे. त्यामुळे शेती बागायतीवर जास्त शेतकरी अवलंबून आहेत. त्यांच्या उदरनिर्वाहाचे हे साधन आहे. नैसर्गिक आपत्ती पाठ सोडत नाही, अशीच परिस्थिती यंदादेखील निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

पावसामुळे पालघर जिल्ह्यातील पीक वाया गेले. मजुरीपासून खत, ट्रॅक्टर, नांगर, भात, विविध भाजीपाला आणि बी-बियाण्यांसह अन्य खर्च तसेच मेहनत पाण्यात गेली. प्रचंड नुकसानीला सामोरे जावे लागले असून, शासनाने आता आर्थिक मदतीचा हात द्यावा, अशी मागणी शेतकरीवर्गातून करण्यात आली आहे. तसेच अवकाळी पावसाने वीटभट्टीत चिखल निर्माण झाल्यामुळे वीटभट्टीचालकदेखील आर्थिक कोंडीत सापडला आहे. आता प्रत्येक तालुक्यात पिकांचे पंचनामे केले असून, याचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे, परंतु आता नुकसानभरपाई केव्हा मिळेल, याची प्रतीक्षा शेतकरी राजा करत आहे.

पालघर जिल्ह्यात अवकाळी पावसाने बाधित झालेल्या बागायती क्षेत्राचा पंचनामा करण्यात आला व नऊ कोटींहून अधिक नुकसान झाल्याचा अहवाल हा शासनाकडे देण्यात आला असून, नुकसानभरपाई थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे.
- नीलेश बागेश्वर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

अवकाळी पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपले यात ७०० पेक्षा जास्त घरांचे, तर ५० बोटी व बागायत लागवडीखालील हजारो हेक्टर जमीन बाधित होऊन नुकसान झाले. पालघर जिल्ह्यातील शेतकरी हा बागायतीतून उत्पन्न घेत असतो, परंतु रब्बी पिकांनादेखील आर्थिक फटका सहन करावा लागला आहे.

पालकमंत्री गणेश नाईक यांनी केली मागणी
पावसाने जिल्ह्यात झालेले नुकसान पाहून त्यांना भरपाई मिळावी यासाठी तातडीने लक्ष देण्याचे निर्देश पालकमंत्री गणेश नाईक यांनी जिल्हा कृषी विभागाला केले होते. त्यानुसार प्रशासनाकडून त्वरित हालचाली सुरू झाल्या व प्रत्येक तालुक्यातील बागायत क्षेत्राचा पंचनामा करण्यास सुरुवात केली होती.

मच्छीमार बांधवांचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. डहाणू येथील ६० बोटी अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडल्या, तर वादळामुळेदेखील मच्छीचे नुकसान झाले. घरांवरील पत्रे कोसळल्याने नुकसानभरपाई शासनाने द्यावी, अशी मागणी मच्छीमार बांधव करत आहेत.
--------------
जिल्ह्यात पावसाने बाधित जमीन - २७००. ४७ हेक्टर
शासनाकडे मागणी - ९ कोटी, २३ लाख , ७७ हजार
--------------
अवकाळी पाऊस गतवर्षी नुकसान - ७ कोटी ८७ लाख ३६ हजार रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com