उत्तन-विरार सागरी महामार्गाचा मार्ग बदलावा

उत्तन-विरार सागरी महामार्गाचा मार्ग बदलावा

Published on

भाईंदर, ता. २९ (बातमीदार) : मुंबईतील वर्सोवा ते उत्तन व पुढे वसईपर्यंत जाणाऱ्या सागरी महामार्गामुळे मच्छीमारांचा मत्स्यव्यवसाय संकटात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा महामार्ग उत्तनजवळील समुद्रातून न नेता त्याचा मार्ग बदलण्यात यावा व तो दहिसर-भाईंदर जोडरस्त्याला जोडण्यात यावा, अशी विनंती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

मुंबईतील सागरी महामार्ग वर्सोवा ते उत्तन व पुढे वसई ते थेट वाढवण बंदरापर्यंत नेण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव आहे. उत्तन येथे हा महामार्ग किनाऱ्यापासून सुमारे तीनशे मीटर आत समुद्रातून जाणार आहे. या भागात पारंपरिक कवी पद्धतीने मासेमारी करणारे मच्छीमार मासळी पकडतात. नेमका याच भागातून सागरी महामार्ग नेण्याचा प्रस्ताव आहे. त्याचा मोठा फटका मच्छीमारांना बसण्याची भीती आहे. राज्य सरकारने मासेमारीला नुकताच शेतीचा दर्जा दिल्याने मच्छीमार आनंदात आहे. असे असताना सागरी महामार्गामुळे त्यांच्या उदरनिर्वाहावरच संकट येणार आहे. यासाठी या महामार्गाचा मार्ग बदलण्यात यावा, अशी मच्छीमारांची मागणी आहे. यासंदर्भात एमएमआरडीएकडे झालेल्या सुनावणीदरम्यानही मच्छीमारांनी हा पर्याय सुचवला होता.

मच्छीमारांच्या शिष्टमंडळाने नुकतीच परिवहनमंत्री सरनाईक यांची भेट घेतली व त्यांना ही समस्या सांगितली. त्यावर सरनाईक यांनी मच्छीमारांची बाजू उचलून धरत सागरी महामार्गाचा मार्ग बदलण्याची विनंती मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com