अर्जुनली ग्रामपंचायत वादाच्या भोवऱ्यात
भिवंडी, ता. २ (बातमीदार) : तालुक्यातील अर्जुनली ग्रामपंचायतीच्या आदिवासी महिला उपसरपंचांनी अपमानास्पद वागणूक मिळत असल्याची तक्रार पडघा पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. तसेच सरपंच, ग्रामसेवकावर भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे ग्रामपंचायतीचा कारभार वादात सापडला आहे.
अर्जुनली ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात अफरातफर होत असल्याचा आरोप उपसरपंच उषा कदम यांनी केला आहे. याबाबत त्यांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे अर्ज विनंत्या करीत माहिती मागितली होती. तसेच माहिती अधिकारातूनही विचारणा केली होती, परंतु त्यांना ग्रामविकास अधिकारी आणि सरपंच यांनी जाणीवपूर्वक माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप उपसरपंच कदम यांनी केला आहे. अर्जुनली ग्रामपंचायतीला पूर्ण वेळ ग्रामविकास अधिकारी पाहिजे, अशी स्थानिक ग्रामस्थांची मागणी आहे. ग्रामपंचायतीमध्ये मागासवर्गीयांसाठी असलेला १५ टक्के निधी खर्च झाला नाही, याबाबतची माहिती मासिक सभेत उपसरपंच उषा कदम यांनी माहिती मागितली होती, पण त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली गेली होती. यावरून उपसरपंच कदम यांच्या नामफलकाची काही सदस्यांनी तोडफोड केली. या सर्व घटना अपमानास्पद असल्याने उपसरपंच उषा कदम यांनी पडघा पोलिसात तक्रार नोंदवली आहे. तसेच संबंधितांवर अनुसूचित जातीजमाती प्रतिबंधक कायदा १९८९ नुसार कार्यवाहीची मागणी केली आहे.
दरम्यान, अर्जुनली ग्रामपंचायतीमध्ये कोणताही घोटाळा झालेला नाही. तसेच निधी कुठे कसा खर्च झाला याची सर्व कागदपत्रे उपलब्ध असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य महेश राऊत यांनी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.