पर्यावरणासाठी हरियालीचे योगदान: नागरिकांना वृक्षारोपणासाठी आवाहन

पर्यावरणासाठी हरियालीचे योगदान: नागरिकांना वृक्षारोपणासाठी आवाहन

Published on

पर्यावरणासाठी ‘हरियाली’चे योगदान
नागरिकांना वृक्षारोपणासाठी आवाहन
मुलुंड, ता. ५ (बातमीदार) ः गेल्या २८ वर्षांपासून पर्यावरण रक्षणासाठी कार्यरत असलेल्या मुलुंड येथील ‘हरियाली’ या सेवाभावी संस्थेने जनसहभागातून एक उदाहरणात्मक चळवळ उभी केली आहे. संस्थेच्या पुढाकारातून आतापर्यंत लाखो देशी वृक्षांचे रोपण झाले असून, त्यांचे संगोपन करून निसर्गस्नेही मियावाकी (घनदाट वन) निर्माण करण्यात आले आहे.
१० हजार रोप मोहिमेंतर्गत विशेष उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत मुलुंड पूर्वेतील आयटीआय प्रांगणात नागरिकांनी गोळा केलेल्या आंब्याच्या बियांपासून सुमारे तीन हजार आंब्याची रोपे (४ ते ५ फूट उंच) तयार करण्यात आली आहेत. ही सर्व रोपे नागरिकांना उपलब्ध करून दिली जात आहेत.
नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभागी होऊन आपल्या परिसरात देशी वृक्षांचे रोपण करावे, त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी घ्यावी आणि पर्यावरण संवर्धनात आपले योगदान द्यावे, असे आवाहन संस्थेने केले आहे.
रोपांची मोफत व्यवस्था
हरियाली संस्थेच्या मुलुंड, ठाणे आणि डोंबिवली येथील रोपवाटिकांमध्ये दरवर्षी १५ हजार देशी वृक्षांची रोपे बियांपासून श्रमदानातून तयार केली जातात. या रोपांची व्यवस्था मोफत केली जाते. एका व्यक्तीला १ ते १० रोपे आणि संस्थांना/गटांना १० ते ५० रोपे दिली जातात. दरम्यान, रोपांची योग्य प्रकारे काळजी घेतल्याचा पुरावा म्हणून रोप लावल्यावर व एक वर्षानंतर रोपांचा फोटो हरियाली संस्थेकडे पाठवणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com