एआयद्वारे कंत्राटदारांना तीन कोटी रुपये दंड
एआयद्वारे कंत्राटदारांना तीन कोटी रुपये दंड
नालेसफाईच्या कामात दिरंगाई; ८२.३१ टक्के काम पूर्ण
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ ः कृत्रिम बुद्धिमत्तेच्या निरीक्षणाद्वारे सुमारे तीन कोटी रुपयांपेक्षा अधिक दंडाची आकारणी कंत्राटदारांकडून केल्याची कबुली पालिका प्रशासनाने दिली आहे. मिठी नदीसह मोठ्या आणि लहान नाल्यांची सफाई कामे आतापर्यंत ८२.३१ टक्के पूर्ण झाल्याचा दावा दावाही केला आहे.
नाल्यांमधून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी ८० टक्के गाळ काढला होता. यंदा पावसाळ्यापूर्वी एकूण नऊ लाख ६८ हजार मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. आतापर्यंत सात लाख ९६ हजार ७६५ मेट्रिक टन म्हणजे निर्धारित उद्दिष्टाच्या ८२.३१ टक्के गाळ काढण्यात आला आहे. गाळ काढण्याचे काम नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असून, या कामी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रणालीचा वापर केला जात आहे. या प्रणालीच्या निरीक्षणाद्वारे सुमारे तीन कोटी रुपयांपेक्षा अधिक दंडाची आकारणी कंत्राटदारांकडून वसूल करण्यात याली आहे.
जूनच्या पहिल्या आठवड्यात सर्व प्रमुख नाल्यांमधील गाळ काढण्याची कामे पूर्ण झाली आहेत. मिठी नदीतील गाळ काढण्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. नदीतून गाळ काढण्याची कार्यवाही अधिक वेगाने सुरू असल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले. नालेसफाई सुरूच राहणार आहे.
व्हिडिओ चित्रीकरण
गाळ काढण्याची कामे योग्यरित्या होण्यासह त्यावर देखरेख करण्याच्या दृष्टीने पालिका प्रशासनाने या कामांसाठी व्हिडिओ चित्रीकरण आणि सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण बंधनकारक केले आहे.
काढलेल्या गाळाचा तपशील (गाळ मेट्रिक टन)
नाले उद्दिष्ट काढलेला गाळ टक्केवारी
मोठे नाले ३,५७,४३० ३,७८,२१४ १०५.८१
छोटे नाले ३,९६,२६२ २,८६,००४ ७२.१८
मिठी नदी २,१४,३१५ १,३२,५४५ ६१.८५ .
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.