गुन्हा नोंदवण्यातील दिरंगाई भोवणार
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ५ : मारहाणीचा गुन्हा नोंदवण्यासाठी पाच दिवसांचा अवधी लावणाऱ्या नेरळ पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार राजाराम पिंगळे कोकण विभागीय पोलिस तक्रार प्राधिकरणाच्या चौकशीत दोषी आढळले आहेत. यासंबंधीचा अहवाल प्राधिकरणाकडून गृह विभाग तसेच रायगड पोलिस अधीक्षकांना पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे कारवाईतील दिंरगाई त्यांना भोवण्याची शक्यता आहे.
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामधील नेरळ परिसरात राहणारे अयुब इद्रुस आढाळ यांच्या मुलाला मारहाण झाली होती. याप्रकरणी नेरळ पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेले होते, परंतु पोलिस हवालदार राजाराम पिंगळे यांनी उशिराने तक्रार नोंदवली होती. या प्रकणात तत्काळ तक्रार नोंदवण्यात आली नसल्यामुळे पोलिस हवालदार पिगंळे यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असा अर्ज कोकण विभागीय पोलिस तक्रार प्राधिकरणाकडे केला होता. या तक्रारीची प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधीश प्र. चि. बावस्कर, सदस्य तथा सेवानिवृत्त पोलिस उपायुक्त सुधीर दाभाडे, सदस्य महेश भिंगार्डे यांच्या खंडपीठासमोर सविस्तर चौकशी झाली. त्यात तक्रारदार अयुब, पोलिस हवालदार पिंगळे आणि साक्षीदार यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. तसेच दवाखान्यामध्ये अयुब यांच्या जखमी मुलाचा जबाब नोंदवून दखलपात्र स्वरूपाचा गुन्हा घडल्याचे स्पष्ट होऊनही पाच दिवसांनी गुन्हा दाखल केल्याने कर्तव्यात दिरंगाई केल्याचा ठपका प्राधिकरणाकडून ठेवण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.