जेएनपीएच्या लॉन्चेस आता भाऊच्या धक्क्यापर्यंत
उरण, ता. ८ (वार्ताहर) : जेएनपीए बंदर ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत चालणाऱ्या जेएनपीए जलसेवेत पावसाळ्यातील वातावरणामुळे बदल करण्यात आला आहे. ही सेवा आता जेएनपीए ते भाऊचा धक्का यादरम्यान राहणार आहे. पावसाळ्यात १ जून ते ३० सप्टेंबरपर्यंत हा बदल राहणार आहे.
जेएनपीए बंदरातील कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना जेएनपीए ते मुंबई यादरम्यान प्रवास करता यावा यासाठी जेएनपीएने स्वतःची जलसेवा सुरू केली आहे. बंदरावर आधारित पाच खासगी बंदर आणि बंदराच्या कामगार वसाहतीत वास्तव्य करणारे नागरिक सध्या या सेवेचा लाभ घेत आहेत. ही सेवा जेएनपीए बंदर ते गेटवे ऑफ इंडिया अशी चालविण्यात येते; मात्र पावसामुळे खवळलेला समुद्र आणि त्यामुळे जलप्रवासातील धोके लक्षात घेऊन ही सेवा गेटवेऐवजी भाऊचा धक्क्यापर्यंत सुरू केली जाते. त्यामुळे मोरा-मुंबईप्रमाणेच जेएनपीए ते गेटवे जलसेवेत बदल करण्यात आला असून, हा बदल पावसाळ्याच्या चार महिन्यांसाठी आहे.
------------
३० सप्टेंबरपर्यंत बदल
जेएनपीए जलसेवा पावसाळ्यातही सुरू आहे; मात्र पावसाळ्यातील खराब हवामानामुळे या सेवेत बदल करण्यात आला आहे. १ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत हा सेवेत बदल असेल; मात्र हवामानातील बदल झाल्यास याच मार्गावर सुरू राहतील, अशी माहिती जेएनपीए जलवाहतूक विभागाचे अधिकारी कॅप्टन बाळासाहेब पवार यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.