खरीप हंगामाची जय्यत तयारी
भिवंडी, ता. ९ (बातमीदार): मेच्या मध्यंतरी सुरू झालेल्या पावसाने बागायतदार, शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती दयनीय झाली आहे. अशातच राज्यात मॉन्सूनची वाटचाल संथ गतीने सुरू असल्याने खरीप हंगामातील भातशेतीकरिता पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये शेती मशागतीची कामे पूर्ण करून भात पेरणीच्या कामांनी जोर धरला आहे.
भिवंडी तालुक्यातील १६,८०० हेक्टर भातपिकाचे क्षेत्र आहे. अशातच यंदा हवामान विभागाने महाराष्ट्रात लवकर मॉन्सूनचे आगमन होणार असल्याचे भाकीत केले होते. त्याप्रमाणे पावसाने हजेरीदेखील लावली होती, परंतु त्यानंतर पावसाने पाठ फिरवल्याचे चित्र आहे. असे असले काही दिवसांपासून अधूनमधून बरसणारा वरुणराजा शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरत आहे, कारण अशा प्रकारचे वातावरण खरीप हंगामातील भातशेतीला पोषक आहे. त्यामुळे बियाणे पेरणीच्या कामांना वेग आला असून, हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाऊस कोसळणार का, हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.
-----------------------------------
भातलागवडीवर भर
वेळेत पाऊस पडावा आणि भरघोस पीक मिळावे, यासाठी शेतकरी निसर्गाकडे डोळे लावून बसला आहे. त्यामुळे बळीराजाने भात बियाणांची पेरणी करून बियाणे शेतात रुतण्यासाठी आणि जमीन चारही बाजूंनी समांतर करण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे यंदा भिवंडी तालुक्यात शंभर टक्के भातलागवड होण्याची शक्यता असल्याची माहिती भिवंडी तालुका कृषी अधिकारी ज्ञानदेव शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.