टायर कंपन्यांना विक्रमगडमधून विरोध

टायर कंपन्यांना विक्रमगडमधून विरोध

Published on

विक्रमगड, ता. १० (बातमीदार) : एकीकडे टायर कंपन्यांमुळे वाडा तालुका हैराण झाला असताना आता विक्रमगड तालुक्यातदेखील खराब टायरपासून ऑइल आणि अन्य उत्पन्न घेणाऱ्या प्रदूषणकारी कारखान्यांनी बस्तान बांधण्याचे काम सुरू केले आहे, मात्र या टायर कंपन्यांना विक्रमगड तालुक्यात विरोध होऊ लागला आहे.

विक्रमगड तालुक्यातील वसुरी ग्रामपंचायतीमध्ये टायर कंपन्यांच्या परवानगीसाठी अर्ज दाखल करण्यात आले आहेत, मात्र आरोग्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन ग्रामस्थांनी परवानगी देण्याच्या आधीच या कंपन्यांना विरोध केला आहे. या कंपन्यांना परवानगी देऊ नये, यासाठी वसुरीतील नागरिकांनी ग्रामपंचायतीला अर्ज दिला आहे. ग्रामपंचायत ह‌द्दीत कोणत्याही टायर कंपनी अथवा त्यापासून इतर उत्पादन तयार करणाऱ्या कंपनीला कोणत्याही प्रकारची परवानगी देऊ नये. टायर कंपनीपासून तयार होणाऱ्या मालापासून मानवी जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच त्यापासून येणाऱ्या दुर्गंधीपासून आजार भविष्यात उ‌द्भवू शकतात. त्यामुळे मानवी आरोग्य हे धोक्यात येऊ शकते आणि जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. टायर कंपनीपासून आपटी खुर्द, माळेपाडा, निंबळेपाडा, माले, वसुरी व आजूबाजूच्या ग्रामपंचायतीतील इतर पाड्यांतील मानवी वस्तीला, तसेच निसर्ग, शेतजमिनी प्रदूषित होऊन त्यापासून नापीक होऊ शकतात, असे निवेदनात म्हटले आहे.

टायर कंपन्यांनी लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अशा कंपन्या वसुरी ग्रामपंचायत हद्दीत येऊ पाहत आहेत. या कंपन्यांना आमचा तीव्र विरोध असून, जर ग्रामपंचायतींनी या कंपन्यांना परवानगी दिल्यास आम्ही रस्त्यावरची लढाई लढू.
- प्रमोद पाटील, ग्रामस्थ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com