वाहतूक पोलिसांची वरिष्ठांकडे तक्रार
भिवंडी, ता.१७ (वार्ताहर)ः शहरात वाहतूक पोलिसांकडून रिक्षाचालकांवर कारवाई केली जात आहे. पण आकारण्यात येणारा दंड अन्यायकारक असल्याची तक्रार रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भिवंडी वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलिसांकडे केली आहे.
शहरात राजनोली नाका व अशोक नगर परिसरात वाहतूक पोलिसांकडून अतिरिक्त प्रवासी अथवा गणवेश, वाहनपरवाना नसल्यास थेट ११ हजार ५०० रुपयांची दंड आकारणी केली जात आहे. दोन दिवसांत २० हून अधिक कारवायांमुळे रिक्षाचालकांमध्ये नाराजी आहे. महत्त्वाचे म्हणजे, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करावी. पण वाहतूक पोलिस मोटर वाहन कायदा कलम ६६/१९२ नुसार थेट परमिट नसल्याबाबतची कारवाई करीत असल्याने हा प्रकार अन्यायकारक असल्याची भावना झाली आहे. त्यामुळे रिक्षा संघटनेचे गिरीश जव्हेरी, कॉम्रेड विजय कांबळे यांनी सहाय्यक पोलिस आयुक्त शरद ओहोळ यांच्याकडे तक्रार केली असून कारवाई थांबली नाहीतर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.