मागील खरिपातील भरपाईची शेतकऱ्यांना प्रतीक्षा
बोर्डी, ता. २२ (बातमीदार) : परिसरात गेल्या आठवड्यापासून मध्यम वाऱ्यासह पावसाची रिपरिप सुरूच असल्याने पेरणीच्या कामाला वेग आला आहे. चालू खरीप हंगामात पावसाची सुरुवात वेळेत झाल्यामुळे बळीराजा समाधानी आहे. तसेच पेरणीच्या कामासाठी उपयुक्त पाऊस पडल्यामुळे कामालाही वेग आला आहे. गेल्या वर्षी खरीप हंगामात झालेल्या नुकसानीच्या भरपाईची अद्याप शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.
६ आणि १२ मे रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे या भागातील चिकू, आंबा, केळी, तसेच भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. खरीप हंगामातील शेती करण्यासाठी बळीराजाला पैशांची अत्यंत गरज आहे. २०२४च्या खरीप हंगामाच्या सुरुवातीला वादळी वारे, संततधार पाऊस व बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे या भागातील फळबागांचे प्रचंड नुकसान झाले होते, ही गंभीर बाब लक्षात घेऊन सरकारने बागायतदारांना भरपाई देण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे पंचनामे झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानीची रक्कम जमा करण्यात येणार होती; मात्र २०२५चा खरीप हंगाम सुरू झाला असूनही मागील भरपाई न मिळाल्याने चालू हंगामातील नुकसानभरपाई मिळेल काय, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.