काळू धरणबाधितांच्या पुनर्वसनाला विरोध
मुरबाड, ता.२१ (वार्ताहर)ः मुंबईकरांच्या पाण्यासाठी कोयना, बारवी, तानसा, भातसा धरणे उभारण्यात आली. पण या धरणांमुळे अनेकांना विस्थापित व्हावे लागले होते. अशातच आता मुरबाड तालुक्यात काळू धरण बांधण्याचा घाट घातला जात असून तेथील विस्थापितांचे पुनर्वसन खापरी, बळेगाव, सायले गावात करण्याला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला आहे.
काळू, शाई धरणात बाधित होणाऱ्या गावांचे पुनर्वसनाची यादी शासनाने प्रसिद्ध केली आहे. या यादीमुळे एकीकडे स्थलांतरित गावातील नागरिकांत संभ्रमाचे वातावरण आहे. तर दुसरीकडे विस्थापितांचे पुनर्वसन खापरी, सायले, बळेगाव धरणाखालील गावात करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. पण खापरी गावातील नागरिकांना शेती व्यतिरिक्त कोणताच व्यवसाय नाही. जोडव्यवसाय म्हणून प्रापंचिक खर्च भागवण्यासाठी दुग्धव्यवसाय केला जातो. अशा गावातील जमीन काळू धरणात विस्थापित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या पुनर्वसनासाठी संपादित केल्यास खापरी येथील शेतकऱ्यांचे उपजीविकेचे साधन हिरावणार असल्याने उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे काळू धरणातील बाधित शेतकऱ्यांचे पुनर्वसन खापरी गावात नको, अशी भूमिका माजी पंचायत समिती सदस्य श्याम राऊत यांनी घेतली आहे.
------------------------------------
संघर्ष उद्भवण्याची शक्यता
या गावांचा आर्थिक, सामाजिक, राजकीय समतोल बिघडण्याचे काम शासन करू पाहत आहे. ‘धरणात बाधित होणाऱ्या गावांना धरण पाहिजे असेल तर जरूर करा पण, आमच्या गावात त्यांचे पुनर्वसन नको’, अशी खापरी ग्रामस्थांची भूमिका असून मुरबाड तहसीलदारांना तशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे. त्यामुळे गावांच्या पुनर्वसनावरून संघर्ष उद्भवण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.