पाणी प्रश्नावर जनसंवाद, महिलांचा सरपंचांना थेट सवाल
पाणीप्रश्नावर जनसंवाद, महिलांचा सरपंचांना थेट सवाल
कर्जत, ता. २३ (बातमीदार) ः निसर्ग सामाजिक संस्था आणि कोरो यांच्या संयुक्त विद्यमाने भिलवले येथे पाणीप्रश्नावर जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
गावातील नागरिकांच्या पाणीसंदर्भातील समस्या ऐकण्यासाठी आणि समाधानासाठी हा कार्यक्रम खास आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून वावर्ले ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रिया प्रफुल्ल विचारे उपस्थित होत्या. त्यांच्या सोबत सदस्य गीता ठोंबरे, मनोहर तोंडकर, नागेश व्होला, पोलिस पाटील अंनता पाटील, तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून विशाखा वाघचौरे, यशोदा गायकवाड, सुषमा पोतदार आणि अनिता जाधव यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या आयोजनकर्त्या अरुणा सुर्वे आणि वाडीतील महिलांनी सरपंचांसोबत थेट संवाद साधत, गावातील नळ योजना नेमकी कधी सुरू होणार, असा थेट प्रश्न उपस्थित केला. यावर उत्तर देताना सरपंच प्रिया विचारे यांनी सांगितले की, पाणी योजना लवकरात लवकर सुरू होण्यासाठी प्रयत्न सुरू असून, पुढील आवश्यक ती कारवाई तत्काळ करण्यात येणार आहे. संस्थेचे कार्य खरोखरच उल्लेखनीय आहे. यापुढेही महिलांना कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास माझा पूर्ण पाठिंबा असेल. कार्यक्रमात अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांनी संस्थेच्या कार्याविषयी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त करत, कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल आयोजकांचे आभार मानले.
.................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.