अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळही होणार मोर्च्यात सहभागी
मराठी साहित्य महामंडळही
होणार मोर्चात सहभागी
मुंबई, ता. २८ ः पहिल्या वर्गापासून तिसरा विषय म्हणून हिंदी भाषेचा पर्याय देण्याविरोधात ५ जुलै रोजी मुंबईत विविध राजकीय पक्ष, संघटनांच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच राज्यातील भाषा व साहित्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केले आहे.
पहिल्या वर्गात मराठीखेरीज दोन भाषा विद्यार्थ्यांसाठी परक्याच असतात. त्या शिकणे त्याला नक्कीच जड जाते, हे बालमानसशास्त्र सांगते. शिक्षकांची मोठ्या संख्येने रिक्त असलेली पदे, अनेक शाळा एक किंवा दोन शिक्षकी असणे, हिंदी अनिवार्य करताना नवीन भरती तूर्त न करता कार्यरत शिक्षकांकडून ती शिकवण्याचा निर्णय, पहिली ते दहावीपर्यंत मराठी व इंग्रजी सक्तीची असताना आठवीच्या मुलांना दुसरीचे मराठी नीट वाचता येत नाही. महाराष्ट्राची ओळख व अस्मिता मराठी भाषा व संस्कृती आहे. ती ओळख पुसट होणे, ही राज्याची सर्वात मोठी हानी ठरेल, अशी भीती जोशी यांनी व्यक्त केली.
--
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.