‘जल जीवन’च्या कामांची चौकशी करा

‘जल जीवन’च्या कामांची चौकशी करा

Published on

विरार, ता. ७ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून होणाऱ्या जलजीवन योजनेच्या पाणीपुरवठा प्रकल्पासंबंधी गंभीर मुद्दे उपस्थित करून अधिकारी आणि ठेकेदारांविरोधात कारवाई करण्याची मागणी माजी आमदार राजेश पाटील यांनी केली आहे. तिल्हेर व इतर १२ गावे, केळवे-माहीम व इतर १८ गावे, खानिवडे, गारगाव व इतर २२ गावे, तसेच सफाळे-नंदाडे या चार पाणीपुरवठा प्रकल्पासंबंधीची गंभीर बाब पाटील यांनी राज्य सरकारसमोर मांडली आहे.

पालघर जिल्ह्यातील जलजीवन योजनेची कामे घोटाळ्यामुळे अडलेली आहेत. आदिवासी बांधवांना पाण्यापासून वंचित ठेवण्याचे काम अधिकाऱ्यांनी केले आहे, अशी भूमिका जिल्हा नियोजनाच्या सभागृहात मांडून तत्कालीन पालकमंत्र्यांकडे जलजीवनच्या कामाची चौकशी करण्याची मागणी पाटील यांनी केली. त्या वेळी पालकमंत्र्यांनी चौकशी समिती नेमली होती. बोईसर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात मागील दोन वर्षांपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणअंतर्गत विविध पाणीपुरवठा योजना सुरू आहेत; परंतु या योजनांची अंमलबजावणी अत्यंत संथ गतीने व निष्काळजीपणे होत आहे. यामुळे जनतेला अद्यापही शुद्ध पिण्याच्या पाण्याचा लाभ मिळू शकलेला नाही, असे पाटील यांनी निवेदनामध्ये म्हटले.

पाणीपुरवठा योजनांची कामे विशेषतः अर्धवट अवस्थेत असून, त्यात दर्जाहीन कामे, अनियमितता व वेळप्रसंगी बिनधास्तपणे बिले काढल्याचेही निदर्शनास आले आहे. या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. या योजनेच्या उद्देशाला हरताळ फासला जात आहे. त्यामुळे त्वरित लक्ष घालणे अत्यावश्यक आहे, असे पाटील यांनी मुख्यमंत्री व पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com