तरुणांनी शेतीपूरक व्यवसायाकडे वळावे!

तरुणांनी शेतीपूरक व्यवसायाकडे वळावे!

Published on

वाणगाव, ता. १ (बातमीदार) : देशातील ७० टक्के लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून असल्याने भारताला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवण्यासाठी शेतीशिवाय पर्याय नाही. विद्यार्थी कृषीचे शिक्षण घेत असताना नोकरी मिळविण्याच्या दृष्टिकोन न ठेवता शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहावे. पारंपरिक शेतीमध्ये बदल करून आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे. विद्यार्थ्यांनी सरकारच्या शेतीपूरक योजनांचे आकलन करून त्यांचा प्रसार इतर शेतकऱ्यापर्यंत करावा. नोकरीच्या मागे न लागता शेतीपूरक व्यवसाय उभा करून स्वावलंबी बनावे व परिसरातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करावे, असे प्रतिपादन मिलिंद पाटील यांनी कृषिदिनाच्या कार्यक्रमात केले आहे.

आसनगाव येथील कृषी तंत्र विद्यालयात कृषिदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष विकास पाटील, वित्त संचालक लुमेश देसाई, सचिव अक्षय पाटील, कार्यकारी संचालक तृप्ती पाटील, कृषी तंत्र विद्यालयाच्या प्राचार्य सोनालिका पाटील, डॉ. सृष्टी मोरया, प्रा. प्रवीण भोये, प्रा. श्रद्धा कोरे, प्रा. दिलीप पवार, प्रा. नम्रता चव्हाण व विद्यार्थी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com