वन महोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण
विरार (बातमीदार) : महाराष्ट्र सरकारच्या वतीने दरवर्षी ७ जुलैपर्यंत वनमहोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या महोत्सवाचाच एक भाग म्हणून वसईच्या अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाचा आयक्यूएसी विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, वनस्पतीशास्त्र विभाग आणि राज्य सरकारचा वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वनमहोत्सवाच्या पहिल्या दिवशीच मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वनविभागाच्या टेकडीवर वृक्षारोपण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध भारतीय रोपांची लागवड केली. या वेळी मांडवी वनपरिक्षेत्र अधिकारी रीता वैद्य यांनी पर्यावरण, तसेच वृक्षसंवर्धनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. सर्पमित्र आणि पर्यावरण तज्ज्ञ पंकज जाधव यांनी पर्यावरण आणि मानव यांच्यातील नाते विशद केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.