कांचन गडकरींच्या वक्तव्यानं नवा वाद

कांचन गडकरींच्या वक्तव्यानं नवा वाद

Published on

वसंतराव नाईक प्रतिष्ठान आणि वनराई फाउंडेशनतर्फे देण्यात आलेला प्रयोगशील शेतकरी पुरस्कार स्वीकारताना सेवा सदन संस्थेच्या अध्यक्षा आणि सामाजिक कार्यकर्त्या कांचन गडकरी यांनी केलेला मंत्रोच्चाराने सोयाबीनचे पीक वाढवण्याचा दावा हा संपूर्णपणे अशास्त्रीय आहे. या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू, महाराष्ट्रातील हरित क्रांतीसाठी मोठे काम केलेले माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी आपली भूमिका तातडीने जाहीर करावी अशी मागणी महाराष्ट्र अंनिस कडून करण्यात आली आहे

हा पुरस्कार स्वीकारताना कांचन गडकरी यांनी केलेला “शेतात बियाणे पेरल्यापासून धर्मसंस्कार केले तर शेती भरघोस उत्पादन देते. आम्ही आमच्या धापेवाड्यातल्या शेतीत सोयाबीनला श्री सूक्त व मंत्रोच्चार ऐकवले. त्यामुळे उत्पादन वाढले.” हा दावा पूर्ण पणे अशास्त्रीय असून शेतकऱ्यांची दिशाभूल करणारा आहे. मंत्रोच्चारांच्या मध्ये काही विशेष सामर्थ्य असते आणि ते ऐकून सोयाबीनचे झाड स्वत:चे उत्त्पन्न वाढवू शकते ही गोष्ट शास्त्राच्या प्राथमिक तपसणीवर देखील टिकणारी नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com