‘नवभारत साक्षरते’साठी सक्रीय सहभाग घ्यावा

‘नवभारत साक्षरते’साठी सक्रीय सहभाग घ्यावा

Published on

पालघर, ता. ७ (बातमीदार) : पालघर जिल्ह्याचे शंभर टक्के साक्षरतेकडे वाटचाल घडवण्यासाठी नवभारत साक्षरता कार्यक्रमाला सर्व शासकीय यंत्रणांनी सक्रिय सहभाग द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड व मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी केले आहे. जिल्हास्तरीय नियामक समिती व कार्यकारी समितीच्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते.

सरकारच्या निर्देशानुसार राबविण्यात येणाऱ्या नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत २०२७ पर्यंत पालघर जिल्हा १०० टक्के साक्षर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यावर्षी ३३ हजार ६९१ निरक्षरांना साक्षर करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून सर्व तालुकानिहाय व शाळानिहाय उद्दिष्टे दिली गेली आहेत. शाळा, महाविद्यालये, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, स्वयंसेवी संस्था व तरुण मंडळांच्या सहकार्याने गावोगावी सर्वेक्षण करून निरक्षर व स्वयंसेवक यांची नोंदणी ‘उल्लास’ ॲपवर करण्यात येत आहे. त्यानुसार साक्षरता वर्ग सुरू करण्यात आले आहेत.

मागील दोन वर्षांत सुमारे ४० हजार साक्षरांना केवळ लेखन-वाचनच नव्हे, तर आर्थिक, आरोग्य, डिजिटल साक्षरता आणि जीवनकौशल्याचे शिक्षण देण्यात आले आहे. गावपातळीवर प्रत्येक घटकाने पुढाकार घेतल्यास जिल्हा साक्षरतेच्या दिशेने मोठी झेप घेऊ शकेल, असे शिक्षणाधिकारी (योजना) शेषराव बडे यांनी माहिती दिली. या बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी, व्यंकटराव हुंडेकर, सोनाली मातेकर, अशोक पाटील, शेषराव बडे, डॉ. प्रकाश हसनाळकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com