पूर्णवेळ नगररचनाकार नसल्याने विकासकामे ठप्प
अंबरनाथ, ता. ५ (वार्ताहर) : अंबरनाथ आणि बदलापूर या दोन वाढत्या शहरांना अनेक महिन्यांपासून पूर्णवेळ नगर रचनाकार नसल्याने कामे ठप्प झाल्याची तक्रार अंबरनाथ, बदलापूर बिल्डर असोसिएशनने केली. तसेच दोन्हीकडे लवकरात लवकर पूर्णवेळ अधिकारी नेमण्याची मागणीही केली.
अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांचा विकास झपाट्याने होत आहे. शहरांमध्ये अनेक विकासकामे सुरू आहेत. चार महिन्यांपासून पूर्णवेळ नगररचनाकार नसल्याने विकसकांची कामे रखडली. अंबरनाथ पालिकेचे नगररचनाकार विवेक गौतम हे एप्रिल महिन्यात निवृत्त झाले. तर बदलापूर पालिकेचे नगर रचनाकार प्रकाश मुळे हेदेखील तीन महिन्यांपूर्वी निवृत्त झाले. तेव्हापासून या दोन्ही ठिकाणी पूर्ण वेळ अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली नसून सध्या अंबरनाथचा भार ठाणे एसआरएचे नगर रचनाकार अविनाश चव्हाण यांच्याकडे आहे. तर बदलापूरचा भार पनवेल महापालिकेच्या नगर रचनाकारांकडे आहे. हे दोन्ही अधिकारी आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच येतात. विकसकांच्या परवानग्या, दाखले अशी कामे रखडली आहेत. अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरांमध्ये पुनर्विकास आणि नवीन गृहप्रकल्पांची कामे जोरात सुरू आहेत. पूर्ण वेळ नगर रचनाकार नसल्यामुळे ही कामे ठप्प झाल्याची तक्रार असोसिएशनचे सचिव ज्ञानधर मिश्रा यांनी केली आहे. शहराचा विकास आराखडा व विकासासाठी नगरचनाकार हा विभाग महत्त्वपूर्ण आहे. या दोन्ही शहरांत पूर्ण वेळ नगररचनाकारांची नियुक्ती करावी, अशी मागणी मिश्रा यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.