रब्बीतील पिकांचे पावसाने नुकसान
टोकावडे, ता. ५ (बातमीदार)ः मुरबाड तालुक्यात रब्बी हंगाम अवकाळी पावसामुळे भातपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार यांनी मुरबाड तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तत्काळ पंचनामे करून प्रतिहेक्टर एक लाखाची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.
तालुक्यात वादळवाऱ्यासह पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे पीक शेतातच वाया गेले आहे. विशेषतः बळेगाव ग्रामपंचायत हद्दीतील रांजणगाव (नावडीचापाडा) व बळेगाव येथील अनेक शेतकऱ्यांचे भातपीक उद्ध्वस्त झाले असून, कापणी करण्याची संधीही मिळालेली नाही. त्यामुळे जिल्हा परिषद ठाण्याचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, यासाठी तहसीलदार अभिजित देशमुख यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून नुकसानभरपाईसंदर्भात पाठपुरावा केला आहे. तसेच अवकाळी पावसामुळे आर्थिक संकट असल्याने सरकारने तातडीने हस्तक्षेप करताना शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.