प्रवासादरम्यान खड्ड्यांमुळे प्रवाशांची हाडे खिळखिळी
वाडा, ता. ५ (बातमीदार) : निंबवली-पालसई या रस्त्याची दुरवस्था झाली असून, खड्डे पडल्याने रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना पाठीच्या दुखण्याचा आजार होत आहे. या रस्त्यावरून वाहने चालविणाऱ्यांची भीतीने गाळन उडत आहे. मिनी डोअर व प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्या बंद करण्यात आल्याने विद्यार्थी व रुग्णांची मोठी गैरसोय होत असून, त्यांना आठ किमी अंतराचा प्रवास पायी पार करावा लागतो. त्यामुळे या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती न केल्यास आंदोलनाचा इशारा शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे तालुका सचिव सागर पाटील यांनी बांधकाम प्रशासनाला दिला आहे.
निंबवली-पालसई हा रस्ता १७ किमीचा असून, १२ किमी मार्ग दोन वर्षांपूर्वी बनवला असून, त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने हा पूर्ण रस्ता खराब झाला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. रस्त्यावर गुडघाभर खड्डे पडले आहेत. त्यामुळे कोशिमशेत, नांदणी, गायगोठा, अंबर भुई आदी सहा गावांसह १५ गाव-पाड्यांतील वाहनचालकांना मानदुखी, कंबरदुखीचे आजार सुरू झाले आहेत. वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे. या भागातील समस्या सोडविण्याचे आश्वासन लोकप्रतिनिधींनी नागरिकांना दिले होते, परंतु ते हवेतच विरल्याचे दिसून येत आहे. या मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्यांना अनेक आजार जडले आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेऊन किमान वाहतुकीस योग्य अशी तरी दुरुस्ती करून या परिसरातील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.