मराठीच्या मुद्द्यावर लढणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार?
उल्हासनगर, ता. ६ (बातमीदार) : मराठी भाषेच्या अधिकारासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांवर, संघटनांवर आणि राजकीय पक्षांवर राज्य सरकारकडून गुन्हे दाखल करण्याची तयारी सुरू आहे. तसे झाल्यास महाराष्ट्रात सक्रिय असलेल्या उल्हासनगरातील स्वराज्य संघटनेचा विधी विभाग खटला विनामूल्य लढणार, अशी भूमिका ॲड. जय गायकवाड यांनी जाहीर केली आहे.
सत्तेतील भाजप सरकारकडून मराठी माणसाच्या आणि भाषेच्या प्रश्नांबाबत वेगळाच दृष्टिकोन आहे. मराठीसाठी आवाज उठवणाऱ्यांना गुन्हेगार ठरवण्याचा हा प्रयत्न म्हणजे लोकशाहीविरोधी आणि भाषिक अस्मितेचा अवमान करणारा प्रकार आहे, असे मत ॲड. गायकवाड यांनी व्यक्त केले. गुन्हे दाखल झाल्यास त्यांना संपूर्ण कायदेशीर मदत व मार्गदर्शन दिले जाईल. स्वराज्य संघटनेचा एक एक वकील आणि कार्यकर्ता संपूर्ण ताकदीने सोबत उभा राहील. कोणत्याही मराठीप्रेमी कार्यकर्त्याला एकटे पडू दिले जाणार नाही, याची खात्री आम्ही देतो. असे स्पष्ट करताना सर्व मराठीप्रेमी नागरिकांनी, संघटनांनी आणि कार्यकर्त्यांनी हा संदेश गांभीर्याने घ्यावा आणि कुठलीही भीती न बाळगता आपला लढा सुरू ठेवावा, असे आवाहन ॲड. गायकवाड यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.