एकाचे भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचे अप्रासंगिक
एकाचे भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचे अप्रासंगिक
आशीष शेलार यांची ठाकरे बंधूंवर टीका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : दोन ठाकरे भाऊ एकत्र आले, हे खूप छान झाले. दोन कुटुंबे एकत्र झाली त्याचा आम्हाला आनंदच आहे. हिंदू जीवन पद्धतीत कुटुंबाचे महत्त्व खूप आहे. आमची हीच विचारधारा आहे. भाषणाबद्दल सांगायचे तर एकाचे भाषण अपूर्ण आणि दुसऱ्याचे भाषण अप्रासंगिक हाेते, अशी टीका मुंबई भाजप अध्यक्ष आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशीष शेलार यांनी वरळी येथील राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विजयी मेळाव्यावर रविवारी केली.
हिंदीसक्तीच्या मुद्द्यावर विजय मिळाल्याचे सांगून ठाकरे बंधूंनी या मेळाव्याचे आयोजन केले होते; पण त्यांच्या भाषणात मुद्दे नसल्याचे दिसले. त्यामुळे ज्यांच्याकडे मुद्दे नसतात ते गुद्द्यावर येतात आणि सामाजिक व जातीय वितुष्टीकरणाच्या बाजूने भूमिका मांडतात, असा टोलाही आशीष शेलार यांनी लगावला.
कोणी द्वेषाची भावना पसरवू नये आणि महाराष्ट्रात कायदेशीर राहणाऱ्या कोणीही घाबरू नये. मराठी माणसाच्या अस्मितेची, भाषेची, संस्कृतीची चिंता भाजपनेच केली आणि भाजपच करेल. अमराठी माणसानेसुद्धा मराठी माणसाला डिवचू नये, असेही शेलार यांनी स्पष्ट केले.
-----
येथे भाषा विचारून मारहाण!
पहलगाममध्ये धर्म विचारून गाेळ्या घातल्या, तर येथे भाषा विचारून हिंदूंनाच मारहाण केली जात आहे. या दाेन्ही घटनांची तुलना हाेऊ शकत नसली तरी या गोष्टी उद्विग्न करतात. हे अख्खा महाराष्ट्र पाहत आहे. इंग्रजांची रणनीती ‘तोडा आणि राज्य करा,’ अशी हाेती. आता काही पक्षांची रणनीती आहे ‘भीती पसरवा आणि मते मिळवा’, अशी टीकाही शेलार यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.