धामणी धरणाचे पाच दरवाजे उघडले
कासा, ता. ६ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पांतर्गत असलेल्या धामणी धरणातील पाण्याची पातळी वाढल्याने धरण प्रशासनाने रविवारी (ता. ६) सकाळी धरणाचे पाच वक्राकार दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला. यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा नियोजित विसर्ग सूर्या नदीत सुरू करण्यात आला आहे. सकाळी सात वाजता धरणातील पाण्याची पातळी ११५ मीटरवर पोहोचली होती. धरणात एकूण २२८.६५३ दलघमी (दशलक्ष घन मीटर) साठा असून, तो ८२.७४ टक्के क्षमतेने भरलेला आहे. पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी प्रत्येक दरवाजा सुमारे ४० सेंमीपर्यंत उघडण्यात आला असून, सुमारे ४०६१ क्युसेक्स वेगाने पाणी सूर्या नदीत सोडले जात आहे. याशिवाय, विद्युतगृहातून ६५० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे नदीच्या पाण्याची पातळी आणखी वाढणार असल्याची शक्यता आहे. धरण क्षेत्रात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे प्रशासनाने अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. पुढील पावसाच्या तीव्रतेनुसार विसर्गाचे प्रमाण कमी किंवा वाढवले जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.