धरणात ८० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा
धरणात ८० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा
जिल्ह्यातील धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : यंदा मे महिन्यातच पावसाने हजेरी लावली. त्यात जूनमध्येही मुसळधार पाऊस कोसळत होता. आता जुलैच्या पहिल्याच आठवड्यात धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला आहे. त्यामुळे ठाणे आणि मुंबईकरांची तहान भागविणाऱ्या भातसा, तानसा, बारवी व मोडकसागर या धरणांच्या पाणीपातळीत समाधानकारक वाढ झाली आहे. या चारही धरणांची पाणीपातळी ८० ते ८८ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.
ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या सातत्याने पडणाऱ्या पावसाने नद्यांच्या पातळ्यांनी धोक्याची पातळी गाठली. त्यामुळे नदीपात्राजवळच्या गावांना सतर्कतेचा इशारादेखील देण्यात आला आहे, तर दुसरीकडे जनजीवनदेखील विस्कळित झाल्याचे दिसून येत आहे. अशातच धरण क्षेत्रातही पाऊस चांगला झाल्याने ठाणे व पालघर जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीसह धरणांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याचे दिसून आले.
जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील बारवी धरणातील पाणीसाठा ६६ टाक्यांवर पोहोचला आहे, तर भातसा धरणातील पाणीसाठा ६७.७१, तर मोडकसागर ८७.०३, तानसामध्ये ७२.९० टक्क्यांवर पोहोचल्याचे जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. या वाढत्या पाणीसाठ्याने ठाणेकर आणि मुंबईकर नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, मे आणि जून महिन्यात कोसळणाऱ्या पावसामुळे यंदा जून महिन्यातच धरणांमधील पाणीपातळीने ५० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा जमा झाल्याने आगामी दोन महिन्यांत धरणे ओव्हर फ्लो होण्याची शक्यतादेखील व्यक्त करण्यात येत आहे.
पाणीसाठा
धरण टक्केवारी
भातसा ६७.७१
तानसा ७२.९०
म. वैतरणा ८७.२२
बारवी ६६.७९
मोडकसागर ८७.०३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.