राज ठाकरे यांच्यावर कोणीही बोलणार नाही
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : नुकत्याच वरळी येथे पार पडलेल्या विजयी मेळाव्यादरम्यान राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणात आमच्याबद्दल काहीही बोलले नाहीत. त्यामुळे आम्हीदेखील त्यांच्याबद्दल बोलणार नसल्याची भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली. त्यावर शिंदे सेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनीही शिक्कामोर्तब केले आहे.
हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचे दोन शासकीय आदेश रद्द करण्याच्या महायुती सरकारच्या निर्णयावर शनिवारी जल्लोष करण्यासाठी उद्धव सेना आणि मनसेच्या वतीने विजयी मेळावा वरळी येथे घेण्यात आला. त्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या पक्षातील प्रवक्ते आणि नेत्यांना राज ठाकरे यांच्यावर कोणत्याही प्रकारची टीका किंवा बोलू नये, असे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांच्या या बोलण्याचा नेमका अर्थ काय घ्यायचा, असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे. परंतु, म्हस्के यांनी याचे स्पष्टीकरण केले आहे. झालेल्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी न कोणता झेंडा फक्त मराठीचा अंजेडा अशा स्वरूपात भाषण केले. उद्धव सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मात्र शिंदे सेनेवर आगपाखड केल्याचे दिसून आले. त्यामुळेच आता राज ठाकरे यांच्यावर किंवा त्यांच्याविरोधात बोलण्याचा विषय काय येतो, असा सवाल म्हस्के यांनी उपस्थित केला आहे. ना कुठला पक्ष, ना कुठला झेंडा अशी त्यांची भूमिका होती; मात्र उद्धव ठाकरे यांनी हिंदीसक्ती, मराठी भाषा सोडून खालच्या पातळीची टीका केली. मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी भाषण केले. उद्धव ठाकरे हे हारलेले दिसून आल्याची टीका म्हस्के यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केली. त्यामुळे आम्ही फक्त उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलत राहू, असेही त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.