...तर गणेशोत्सव, नवरात्रोत्सवातही प्राण्यांच्या कत्तलींवर बंदीची मागणी होईल
...तर गणेशोत्सवातही बंदीची मागणी होईल!
पर्युषण पर्वात कत्तल बंद ठेवण्यावर न्यायालयाचे मत
सकाळ वृत्तसेवा,
मुंबई, ता. ७ ः जैन समुदायाच्या पर्युषण पर्वात प्राण्यांच्या कत्तलींवर बंदी घालता येऊ शकते का, कायदेशीर तरतुदीअंतर्गत नऊ दिवसांसाठी बंदी घालू शकतो का, अशी विचारणा उच्च न्यायालयाने सोमवारी (ता. ७) याचिकाकर्त्यांना केली. तसेच आता आदेश दिल्यास गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवातही अशीच मागणी केली, असेही न्यायालयाने बोलून दाखवले.
याचिकाकर्त्या जैन समुदायाच्या दोन संस्थांनी गुजरातच्या धर्तीवर मुंबईतही प्राण्यांच्या कत्तलीवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. मुख्य न्या. आलोक आराधे आणि न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठाने मुंबईतील कत्तलखान्यांवर अन्य महापालिका क्षेत्रेही अवलंबून आहेत. त्याचप्रमाणे पर्युषण पर्वात प्राण्यांच्या कत्तलींवर बंदी घालण्याचा आदेश दिला जाऊ शकतो का, अशी विचारणा करून याबाबत कोणताही आदेश देण्यास न्यायालयाने नकार दिला.
राज्य सरकारने वर्षातील १५ दिवस कत्तलीवर बंदी राहील, असे स्पष्ट आदेश आधीच दिले आहेत. त्याबाबतचा शासन निर्णयही आहे. या १५ दिवसांमध्ये पर्युषण पर्वाच्या एका दिवसाचाही समावेश असल्याचे खंडपीठाला सांगण्यात आले. त्याची दखल घेऊन राज्यातील किती टक्के लोकसंख्या शाकाहारी आणि मांसाहारी आहे याची माहिती नसल्याने तसेच सरकारने धोरणात्मक निर्णय घेतल्यानंतर न्यायालय त्यात हस्तक्षेप करू शकते का, असा प्रश्न न्यायालयाने केला. तसेच महापालिकेला याचिकाकर्त्यांच्या मागणीवर योग्य तो निर्णय देण्याचे आदेश दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.