रायगडच्या पालकमंत्री पदावरून वाद पेटला

रायगडच्या पालकमंत्री पदावरून वाद पेटला

Published on

रायगडच्या पालकमंत्रिपदावरून वाद पेटला
कर्जत, ता. ८ (बातमीदार) ः रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत मोठा वाद निर्माण झाला आहे. कर्जत विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट नाराजी व्यक्त केली आहे. पालकमंत्रिपदावरून शिवसेनेत नाराजीचा सूर चढला असून, महायुतीत तणाव वाढत चालला आहे. कर्जत येथील आषाढी एकादशी सोहळा आटोपल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
आमदार थोरवे यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर टीका करत, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आदिती तटकरे यांना पालकमंत्रिपद दिले गेले होते. आता मात्र भाजप सरकार असूनही, शिवसेनेच्या आमदारांना हे पद मिळत नाही, हे दुर्दैव आहे, असे त्यांनी सांगितले. थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही टीका करत, रायगडमधील विकासकामांसाठीचा निधी तटकरे यांच्या माध्यमातून दुसरीकडे वळवला जातोय. शिवसेनेच्या आमदारांना विकासासाठी दुय्यम वागणूक दिली जाते, असा आरोपही त्‍यांनी या वेळी केला. शिवसेनेने सार्वजनिकरित्या आता भारत गोगावले यांना रायगडच्या पालकमंत्रिपदावर नियुक्त करण्याची मागणी केली आहे. त्यांच्याकडे जिल्ह्यातील समस्यांचा अनुभव आहे, असे कारण पुढे करण्यात आले आहे. या वादामुळे महायुतीतील समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिवसेनेने आतापर्यंत राष्ट्रवादीवर टीका केली होती, मात्र आता थेट फडणवीसांवर लक्ष केंद्रित करत वातावरण अधिक तापवले आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com