कळव्यात पाण्यासाठी कळवा प्रभाग समितीवर मोर्चा
कळवा, ता. ८ (बातमीदार) : कळवा खारेगाव, विटावा व कळवा डोंगर परिसरात काही दिवसांपासून अनियमित कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. ऐन पावसाळ्यात नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. नागरिकांच्या समस्याची दखल घेत आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी ठाणे शहराध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, युवा महिला नेत्या नताशा आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (ता. ८) सकाळी पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांनी कळवा नाका ते कळवा प्रभाग समिती असा हंडा कळशी मोर्चा काढला.
या मोर्चात कळव्यातील महिलांनी पाण्यासाठी आक्रोश करत घोषणाबाजी केली. या वेळी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. अनियमित पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी पक्षाने कळवा प्रभाग समितीचे उपायुक्त सांगळे यांना निवेदन दिले. या वेळी पक्षाच्या कार्यकर्ते राजेश खारकर, महिला शहराध्यक्षा सुजाता घाग, कार्याध्यक्ष साबिया मेमन उपस्थित होते. कळवा प्रभाग समितीच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा नियमित सुरू करण्याचे आश्वासन यावेळी दिले. कळवा परिसरात मे महिन्यापासून अनियमित दाबाने पाणीपुरवठा होत आहे. ऐन पावसाळ्यात पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा सुरळीत केला नाही, तर पुन्हा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.