फेरीवाल्यांचा १५ जुलैला मंत्रालयावर मूक मोर्चा
फेरीवाल्यांचा १५ जुलैला मंत्रालयावर मूक मोर्चा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ ः मुंबईतील फेरीवाल्यांच्या न्याय-हक्कांसाठी संयुक्त फेरीवाला संघटना असोसिएशनच्या वतीने १५ जुलैला दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क ते मंत्रालयापर्यंत भव्य मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चात हजारो फेरीवाले सहभागी होणार असून मोर्चा शांततेत आणि शिस्तीत पार पाडला जाईल, अशी माहिती संघटनेचे संजय यादव यांनी दिली.
गेल्या काही महिन्यांपासून मुंबई महानगरपालिका आणि पोलिस प्रशासनाकडून फेरीवाल्यांवर सातत्याने कारवाई होत असून, अनेकांना व्यवसाय करू दिला जात नाही. यामुळे त्यांच्या रोजीरोटीवर गदा आली आहे. ‘दोन रुपये किलो तांदूळ नको; पण स्वाभिमानाने जगण्याची संधी हवी,’ अशा शब्दांत फेरीवाल्यांनी आपली वेदना व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने पंतप्रधान स्वनिधी योजनेतून फेरीवाल्यांना कर्ज आणि व्यवसायासाठी मदत दिली जात आहे; मात्र दुसऱ्या बाजूला स्थानिक प्रशासन त्यांना रस्त्यावर व्यवसाय करू देत नाही, ही स्थिती विरोधाभासी असून याविरोधात आवाज उठवण्याशिवाय पर्याय राहिलेला नसल्याचे संघटनेने म्हटले आहे. मोर्चाचे नेतृत्व संयुक्त फेरीवाला संघटना असोसिएशनचे संस्थापक संजय यादवराव आणि मुंबईचे माजी उपमहापौर बाबूभाई भवानजी करणार आहेत.
...
आयुक्तांना निवेदन देणार!
शासनाच्या धोरणांना अनुसरून आणि लोकशाही मार्गाने शांततेत आंदोलन करीत मागण्यांचे निवेदन सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हा मूक मोर्चा आयोजित करण्यात येणार आहे. मोर्चादरम्यान कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणार नाही, याची पूर्ण हमीही आयोजकांनी दिली आहे. मोर्चासंदर्भात महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन देण्यात आले असून या आंदोलनाला प्रशासनाने सहकार्य करावे, अशी विनंतीही करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.