राज्य सरकारच्या प्रयत्नांबाबत न्यायालय समाधानी
भोंग्यांबाबत सरकारच्या प्रयत्नांवर समाधानी
उच्च न्यायालयाकडून अवमान याचिका निकाली
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : धार्मिक स्थळांवरील बेकायदा भोंग्यांमुळे होणारे ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी राज्य सरकारकडून करण्यात येणाऱ्या प्रयत्नांवर मंगळवारी (ता. ८) उच्च न्यायालयाने समाधान व्यक्त केले. त्यानंतर जवळपास नऊ वर्षांपासून न्यायप्रविष्ट असलेली अवमान याचिका निकाली काढली.
याचिकादाराने माहिती अधिकारात मिळवलेल्या माहितीनुसार, राज्यात धार्मिक स्थळांवरील २,९४० बेकायदा भोंगे अद्यापही काढले नसल्याचे म्हटले होते. त्यावर सरकारी वकील नेहा भिडे यांनी उत्तर दिले. २,९४० पैकी ३४३ भोंगे काढण्यात आले, ८३१ भोंग्यांना परवानगी दिली, ७६७ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या, तर १९ प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. याशिवाय भविष्यात बेकायदा भोंग्यांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती केल्याची माहिती न्यायालयाला दिली. याबाबत सर्व मुद्द्यांची दखल घेत, सरकारकडून न्यायालयाच्या अंतरिम आदेशानुसार बेकायदा भोंग्यांवर कारवाई करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे दाखल अवमान याचिका निकाली काढत असल्याचे मुख्य न्या. आलोक आराधे आणि न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.
---
उल्लंघन झाल्यास तक्रार करा!
दरम्यान, याचिकादारांना नियमांचे उल्लंघन झाल्याचे किंवा होत असल्याचे दिसल्यास त्यांनी याप्रकरणी देखरेखीसाठी स्थापन करण्यात आलेल्या मुख्य अधिकाऱ्यांकडे संपर्क साधण्याचे न्यायालयाने म्हटले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.