आशेळेगावातील दहशत विधानसभेत पोहोचली;
आशेळे गावातील गुन्हेगारीचा मुद्दा विधानसभेत
उल्हासनगर, ता. ८ (वार्ताहर) : आशेळे गावातील वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण पसरले असून, याच गंभीर समस्येची दखल घेत आमदार सुलभा गायकवाड यांनी थेट विधानसभेत आवाज उठवला. गावात शस्त्रधारी युवकांनी नागरिकांवर हल्ला करीत वाहने व दुकाने फोडली आणि तरीही प्रशासन गुन्हेगारी रोखण्यासाठी हालचाल करीत नाही, हे खपवून घेतले जाणार नाही, अशा कठोर शब्दांत त्यांनी पोलिस प्रशासनावर ताशेरे ओढले. विधानसभेत आमदार सुलभा गायकवाड यांनी आक्रमक भूमिका घेत पोलिस प्रशासनावर ताशेरे ओढले. हे नशेखोर गुंड दररोज शस्त्र घेऊन फिरतात, नागरिकांवर हल्ले करतात आणि तरीही पोलिसांनी गप्प बसायचे? प्रशासनाची ही निष्क्रियता म्हणजे गुन्हेगारांना संरक्षण देण्यासारखीच आहे, अशा संतप्त शब्दांत त्यांनी सवाल उपस्थित केला. पुढे त्या म्हणाल्या, की आशेळे गावातील घटनेचा तातडीने तपास व्हावा आणि दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे; अन्यथा मी स्वतः गावकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.