देश चार वेळा सरेंडर झाला प्रसाद लाड यांचे वक्तव्य
देश चार वेळा सरेंडर झाला
प्रसाद लाड यांचे वक्तव्य
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ८ : आपला देश आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने शक्तिशाली हाेताेय. हा देश शाश्वत अशी प्रगती करतो आहे. तो ‘मेक इन इंडिया’सारख्या कार्यक्रमांमधून विकसित भारत बनत आहे, पण हाच देश पूर्वीच्या नाकर्ते सरकारच्या काळात इतिहासात चार वेळा सरेंडर झाला आहे, अशी टीका भाजपचे विधान परिषदेतील मुख्य प्रतोद प्रसाद लाड यांनी परिषदेत केली.
विधान परिषदेत राज्य सरकार सरेंडर झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्यावर बोलताना प्रसाद लाड म्हणाले ‘‘इथे सरेंडर होण्याचा विषय निघाला आहे, तर मला सरेंडर होण्याची इतिहासातील चार उदाहरणे द्यायची आहेत. हा देश १९४७ मध्ये लॉर्ड माऊंटबॅटन कराराच्या वेळी सरेंडर झालेला पाहिला. चीनबरोबरच्या युद्धानंतर मानसरोवर देऊन सरेंडर झाला होता. भारत पाकिस्तान युद्धानंतर हजारो बंदी सैनिक सोडले गेले, ते सरेंडर होणे होते. त्याचबरोबर पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर शिखांच्या हत्या झाल्या, ते सरेंडर होणे होते’’, असे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.