बेपत्ता नागरिकांची माहिती देण्याचे पोलिसांचे आवाहन
मोखाडा, ता. १० (बातमीदार) : तालुक्यातील दोन नागरिक बेपत्ता झाले आहेत. त्याबाबतची तक्रार मोखाडा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. विविध ठिकाणी शोध घेऊनही या व्यक्ती कुठेही आढळून आलेल्या नाहीत. त्यामुळे हे नागरिक कुठे आढळल्यास कळविण्याचे आवाहन मोखाडा पोलिस उपनिरीक्षक कार्तिक कडु यांनी केले आहे.
मोरचुंडी येथील केरू महादु आहेर (वय ७५) हे १९ सप्टेंबर २०१८ रोजी भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी येथे अंघोळीसाठी जाऊन येतो, म्हणून घराबाहेर पडले, परंतु आजपर्यंत घरी परतलेच नाहीत. त्या वेळी त्यांच्या नातेवाइकांनी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. तसेच बेरीस्ते ग्रामपंचायत हद्दीतील तेली ऊंबरपाडा येथील कमल चंदर जाधव (वय ३६) ही महिला ५ एप्रिल २०२५ रोजी लाडक्या बहिणीचे पैसे बॅंकेत जमा झाले की नाही, हे पाहण्यासाठी आसे येथील बॅंक शाखेत जाऊन येते, असे सांगून घराबाहेर पडली, मात्र ती पुन्हा घराकडे परतलेलीच नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.