खरीप हंगामाच्या भरपाईची प्रतीक्षा

खरीप हंगामाच्या भरपाईची प्रतीक्षा

Published on

बोर्डी, ता. ९ (बातमीदार) : गेल्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याचा निर्णय घेऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे, मात्र काही हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच शेतकऱ्यांना भरपाई मिळाली आहे. उर्वरित शेतकरी, बागायतदारांना अद्यापही भरपाई प्राप्त झाली नसल्यामुळे हा निधी कुठे गेला, असा सवाल ठाणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती विजय म्हात्रे यांनी केला आहे.

२०२४ च्या खरीप हंगामात डहाणू आणि तलासरी तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकरी, बागायतदारांचे मोठे नुकसान झाले होते. या पोटी राज्य कृषी विभागाने पंचनामे केल्यानंतर शेतकऱ्यांना हेक्टरी ३६ हजार रुपये भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याप्रमाणे शेतकऱ्यांना केवायसी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरही आज एक वर्ष पूर्ण झाले, परंतु बागायतदारांच्या खात्यात भरपाईचा निधी प्राप्त झालेला नाही. याबाबत कृषी विभाग व महसूल विभागाकडून कोणतेही ठोस उत्तर मिळत नसल्यामुळे लाभार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निधीचा कुठे अपहार झाला किंवा काय, तसेच निधीवाटपामध्ये विलंब का होत आहे, याची तातडीने वरिष्ठ पातळीवर चौकशी करण्यात यावी, अशी मागणी बागायतदारांच्या वतीने म्हात्रे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com