राज्यातील शंभर टक्के कृषी पंपाल लागणार मीटर
राज्यातील शंभर टक्के कृषिपंपाला लागणार मीटर
महावितरणकडून सर्व अधीक्षक अभियंत्यांना निर्देश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० ः राज्यातील शेतकऱ्यांच्या शंभर टक्के कृषिपंपांना आता वीज मीटर लागणार आहे. महावितरणकडून राज्यभरातील घरगुती वीज ग्राहकांच्या घरी स्मार्ट मीटर लावण्याची मोहीम जोरदार सुरू आहे. त्यामुळे त्याठिकाणी सध्या असलेले डिजिटल मीटर काढले जात आहेत. त्यामुळे तेच मीटर आता कृषिपंपाला लावण्याचे निर्देश महावितरणने आपल्या विभागीय कार्यालयांना दिले आहे. त्यामुळे मीटरशिवाय असलेल्या जवळपास १७ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या कृषिपंपाला मीटर लागणार आहेत.
महावितरणचे राज्यभरात ५० लाखांहून अधिक कृषिपंपधारक शेतकरी ग्राहक आहेत. सुरुवातीला सर्व कृषिपंपाला अश्वशक्तीच्या (एचपी) आधारे वीजबिल दिले जात होते; मात्र गेल्या काही वर्षांपासून महावितरणकडून शेतकऱ्याला नवीन वीजजोडणी देताना डिजिटल मीटर बसवले जात आहेत; मात्र जुन्या कृषिपंपधारक शेतकऱ्यांचे अद्याप अश्वशक्तीच्या अधारेच बिलिंग होत आहे. दरम्यान, महावितरणने इतर ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम वेगाने राबवली जात असल्याने त्या ठिकाणचे डिजिटल मीटर उपलब्ध होत आहेत. सध्या अशाप्रकारे उपलब्ध जवळपास सव्वा लाख मीटर उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे या मीटरमध्ये योग्य बदल करून ते शेतकऱ्यांच्या कृषिपंपाला बसवण्याचे निर्देश विभागीय कार्यालयांना दिले आहे. त्यामध्ये साडेसात एचपीच्या कृषिपंपाला प्राधान्याने मीटर लावले जाणार आहेत. त्यामुळे कृषिपंपाला वापल्या जाणाऱ्या विजेचे अचूक बिलिंग होऊ शकणार आहे. दरम्यान, आतापर्यंत पाच हजार ५३ मीटर शेतकऱ्यांच्या कृषिपंपाला लावण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.