मराठीची चळवळ व्यापक स्तरावर
मराठीची चळवळ व्यापक स्तरावर
मराठी एकीकरण समितीचा निर्धार
भाईंदर, ता. ९ (बातमीदार) : मिरा रोड येथील मराठी अस्मितेच्या मोर्चाला अभूतपूर्व यश मिळण्यामध्ये मराठी एकीकरण समितीचे महत्त्वपूर्ण योगदान होते. मराठी भाषा आणी तिच्या सन्मानासाठी कायम संघर्ष करत असलेल्या या समितीने ही चळवळ आता राज्य स्तरावर नेण्याचा निर्धार केला आहे. राज्यात ज्या ज्या ठिकाणी मराठीवर अन्याय होईल, त्या त्या ठिकाणच्या सर्वपक्षीय नेत्यांना मराठीच्या झेंड्याखाली एकत्र आणून मराठी भाषेला न्याय देण्याचा निर्धार समितीकडून व्यक्त करण्यात आला आहे.
मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या मिरा रोडमधील व्यापाऱ्याला मारहाण झाल्यानंतर व्यापऱ्यांनी त्याविरोधात मोर्चा काढला. या मोर्चाला मोर्चानेच प्रत्युत्तर देण्याची घोषणा मराठी एकीकरण समिती व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली होती. त्यासाठी सर्व राजकीय पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले होते. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती, मात्र मोर्चाच्या अयोजनाची माहिती सर्वसामान्य मराठी माण्सापर्यंत पोहोचविण्यात आयोजकांना यश आले. त्यामुळेच या आंदोलनाला अभूतपूर्व असे यश मिळाले. आंदोलक स्वयंस्फूर्तीने या आंदोलनात सहभागी झाले. या आंदोलनाची गनिमी कावा पद्धतीने केलेली आखणीदेखील विशेष नजरेत आली. मिरा रोडचा बालाजी हॉटेल चौक हे या आंदोलनाचे मुख्य ठिकाण होते. या चौकात आंदोलक एकाच वेळी व एकत्रितपणे जमा न होता थोड्या थोड्या अंतराने, गटागटाने व वेगवेगळ्या मार्गाने ते आंदोलनाच्या ठिकाणी जमा होत गेले. त्यामुळे पोलिसांची अक्षरश: तारांबळ उडत होती.
मिरा-भाईंदर येथील आंदोलनाच्या यशापासून स्फूर्ती घेऊन मराठी अस्मितेची ही चळवळ राज्य स्तरावर नेण्याचा निर्धार मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी व्यक्त केला आहे. राज्यात ज्या ज्या ठिकाणी मराठीवर अन्याय होईल, त्या त्या ठिकाणी समितीचे कार्यकर्ते पोहोचतील. त्या ठिकाणच्या सर्वच राजकीय पक्षांना राजकारण बाजूला ठेवून मराठीसाठी एकत्र या, असे आवाहन करतील. मराठी माणसाची एकत्रित ताकद दिसली, तर मराठी भाषेकडे डोळे वाकडे करून बघण्याची कोणाचीही हिंमत होणार नाही, असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला आहे.
सरनाईकांना देण्यात आलेल्या वागणुकीमुळे नाराजी
मोर्चाला भेट देण्यासाठी आलेल्या परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांना आंदोलकांपैकी काही जणांनी सभेच्या ठिकाणी प्रवेश करू दिला नाही. त्यांच्या विरोधात राजकीय घोषणाबाजी करण्यात आली. वाद आणखी वाढू नये, म्हणून सरनाईक यांनी परत जाण्याचा निर्णय घेतला, मात्र या घटनेमुळे आंदोलकांध्ये मतभिन्नता झाली असल्याचे दिसून आले आहे. या मोर्चाला सर्वच पक्षांना निमंत्रित करण्यात आले होते, मात्र सरनाईक आल्यानंतर राजकीय घोषणाबाजी झाल्याने काहीजणांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.