पाणीपट्टी दरवाढ रद्द करा, अन्यथा आंदोलन अटळ!
पाणीपट्टी दरवाढ रद्द करा अन्यथा आंदोलन अटळ!
मनसेचा इशारा, उल्हासनगरात १४ जुलैपासून बेमुदत उपोषणाचा इशारा
उल्हासनगर, ता. १० ( वार्ताहर) : उल्हासनगर शहरातील नागरिकांच्या खिशाला तूट देणाऱ्या पाणीपट्टी दरवाढीच्या निर्णयाविरोधात जनआंदोलनाचा एल्गार पुकारण्यात येणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रशासनाला ‘पाणी दरवाढ मागे घ्या अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरणार’ असा स्पष्ट इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवार (ता. १४) पासून जिजामाता उद्यान चौक, मराठा विभाग ३२, उल्हासनगर ४ येथे सकाळी ११ वाजता बेमुदत उपोषणाला सुरुवात होणार आहे. उल्हासनगर महापालिकेने १४ फेब्रुवारी २०२५ रोजी पारित केलेल्या प्रशासकीय ठराव क्रमांक ८१ अन्वये शहरातील पाणीपट्टी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र हा निर्णय शहरातील सर्वसामान्य नागरिक, व्यापारीवर्ग आणि रहिवासी संघटनांवर अन्यायकारक असल्याचे सांगत मनसेने २८ मार्चपासून सातत्याने याविरोधात प्रशासनाबरोबर पत्रव्यवहार सुरू केला, मात्र अजूनही पालिकेने कोणताही निर्णय घेतला नसल्याने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
मनसेचे उपाध्यक्ष सचिन कदम यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या उपोषणात, “पाण्याची दरवाढ कमी, तरच मीटरची हमी”, असा ठाम संदेश दिला जात आहे. या उपोषणात मंगेश परब, उपेंद्र परब, जितेंद्र पाटील, राजा चांदिरामानी, हेमंत शिंदे, योगेश संगारे, संजय नार्वेकर तसेच विविध सामाजिक, व्यापारी, क्रीडा संघटना आणि उत्सव मंडळांचा सहभाग असणार आहे. पालिकेने जर यावर तातडीने सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचे सचिन कदम यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.