
वन जमिनीवरील झाडांची कत्तल
आदिवासी जमीन बळकावण्याचा प्रयत्न
कल्याण, ता. १० ( वार्ताहर) : तालुक्यातील कांबा गावातील भूमाफियांनी आदिवासी आणि सरकारी जमीन बळकावण्याच्या उद्देशाने महसूल विभागाच्या जमिनीतील शेकडो झाडांची कत्तल केली आहे. याला स्थानिक सामाजिक संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. याप्रकरणी ‘परहित चॅरिटेबल सोसायटी’चे अध्यक्ष विशाल गुप्ता यांनी कल्याणचे वन अधिकारी, तहसीलदार आणि ठाणे जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे झाडे तोडल्याबद्दल तक्रार केली आहे.
झाडे तोडणाऱ्या रामकिशोर खुबचंदानी आणि संजय शहा यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या प्रकरणाबाबत कल्याणचे वन अधिकारी शिंदे म्हणाले की, ज्या ठिकाणी झाडे तोडली आहेत, त्या ठिकाणी विभागीय भेट दिली आहे. परवानगीशिवाय झाडे तोडण्यात आली आहेत. त्यामुळे त्या जागेचा पंचनामा करण्यात आला आहे. कल्याण मंडळचे वरिष्ठ अधिकारी नीलेश आखाडे यांना अहवाल सादर करण्यात आला आहे. तसेच हिरवी झाडे तोडणारे रामकिशोर खुबचंदानी आणि संजय शहा यांना नोटीस बजावली आहे.
कारवाईला विलंब
वन विभागाला हिरवी झाडे तोडणारे लोक कोण आहेत हे कळले आहे, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न विशाल गुप्ता यांनी केला आहे. कल्याण तहसीलच्या रिकाम्या जमिनींवर भूमाफियांचे डोळे लागले आहेत. भूमाफिया त्यांच्या वर्चस्वाच्या बळावर कांबा गावाभोवती महसूल विभाग आणि गरीब आदिवासींच्या जमिनीवर कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे प्रशासनाची परवानगी न घेता शेकडो झाडे तोडल्याचे गुप्ता यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.