ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे जीवनदान

ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे जीवनदान

Published on

ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे जीवदान
काळू नदीत तिघे वाहून गेले
टिटवाळा, ता. १० (वार्ताहर) : काळू नदीजवळ फिरण्यासाठी गेलेले तीन तरुण पोहण्यासाठी पाण्यात उतरले; पण अचानक वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे ते वाहून गेले; मात्र ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत दाखवलेल्या धाडसामुळे त्यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात यश आले.
मंगळवारी (ता. ८) दुपारी घडलेल्या या घटनेत नदीच्या लहान पुलाखाली अडकलेले तीन जण एका झाडाच्या फांदीला आणि दोरीला धरून आपला जीव वाचवत होते. मुसळधार पावसामुळे नदीचे पात्र भरून वाहत होते. पोहता येत असूनही प्रवाहाच्या अंदाजाने चुकलेल्या या तरुणांना तातडीची मदत आवश्यक होती. पुलावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांना हे तरुण पाण्यात अडकल्याचे लक्षात येताच त्यांनी स्थानिक ग्रामस्थांना माहिती दिली. जवळील गुरवली पाड्यातील मच्छीमार मिलिंद एकनाथ दळवी, सुनील जाधव आणि इतरांनी दोरखंड व आवश्यक साहित्य घेऊन घटनास्थळी धाव घेतली. आठ-दहा ग्रामस्थांनी एकत्र येत दोरखंडाच्या मदतीने एक-एक करून तरुणांना बाहेर काढले. तिसऱ्या आणि शेवटच्या तरुणाला बाहेर काढताना मात्र अधिक अडचण निर्माण झाली. त्याचे ओले हात दोरखंडावरून घसरत होते. चार वेळा प्रयत्न करूनही यश न आल्याने ग्रामस्थांनी दोरखंडाला गाठी मारून पुन्हा सोडला आणि त्या गाठी पकडून अखेर त्याला बाहेर काढण्यात यश मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com