विधवा महिलांच्या अर्थसहाय्यात वाढ करा
‘विधवा महिलांच्या अर्थसाहाय्यात वाढ करा’
जुईनगर, ता. १० (बातमीदार) : नवी मुंबई क्षेत्रातील विधवा महिलांसाठी अर्थसाहाय्य रकमेत वाढ करून उदरनिर्वाहासाठी एक लाख रुपये द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. नवी मुंबई मनपा क्षेत्रात किमान पाच वर्षे वास्तव्य असणाऱ्या आणि पतीचा आकस्मिक मृत्यू झालेल्या विधवा महिलांसाठी वयाची अट शिथिल करीत हे अर्थसाहाय्य केले जावे, अशी मागणी शिवसेना जिल्हा संघटक सरोज पाटील यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
वाढती महागाई, विधवा महिलेची हतबलता याचा विचार करता त्यांना नियोजित अर्थसाहाय्य कमी असून त्यात वाढ केली जावी, अशी मागणी होत आहे. याप्रसंगी शिवसेना संपर्कप्रमुख दमयंती आचरे, शहरप्रमुख सुरेखा गव्हाणे, उपजिल्हा संघटक गीता पाटील, मधुमती हमकर, प्रतिमा सुतार, मनीषा गिरप, तेजस्विनी कोळी, दिव्या घरात, ग्राहक निवारण जिल्हा संघटक सुजाता सुतार, शिवसेना विभागप्रमुख वेता पवार, धनश्री विचारे, उपशहरप्रमुख अंजना भोईटे, समृद्धी मोरे, शाखाप्रमुख श्रद्धा गायकवाड, उपशहरप्रमुख सविता पाटील, विभाग संघटक रेखा कुमार आणि शिवसेना महिला पदाधिकारी व महिला शिवसैनिक उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.