अहिल्याबाई चौकातील बंदिस्त गटाराची दुरवस्था
अहिल्याबाई चौकातील रस्त्यावर सांडपाणी
नव्याने गटार बांधून देण्याची मनसेची मागणी
कल्याण, ता. १२ (वार्ताहर) : अहिल्याबाई चौक परिसरात गटारातील पाणी रस्त्यावर येत आहे. सांडपाण्यातून नागरिकांना चालावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याठिकाणी नव्याने गटार बांधून देण्याची मागणी मनसेचे अहिल्याबाई चौक शाखा अध्यक्ष संदीप पंडित यांनी पालिकेच्या शहर अभियंत्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
अहिल्याबाई चौक येथील अग्रवाल सदन ते शंकरराव चौक दोन्ही बाजूला असलेल्या गटारांतून पाणी रस्त्यावर येत आहेत. पावसाळ्यात तर गुडघाभर पाणी साचते; पण हे गटार खचलेले असून पाऊस नसतानाही तेथे महिन्यातून अनेकदा पाणी तुंबते. तेथील धर्मादाय डोळ्यांच्या दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांना अनेक वर्षापासून त्रास सहन करावा लागत आहे. तसेच प्रकाश टॉवर येथील नागरिकांना सकाळी मंदिरात जाताना सांडपाण्यातून वाट काढत दर्शनाला जावे लागत आहे. तसेच व्यापारीवर्गाला पाण्याच्या दुर्गंधीमुळे दुकानात बसताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.
शंकरराव चौक ते घेलादेवजी चौक ते गांधी चौक येथील गटारातूनही सांडपाणी रस्त्यावर येत आहे. आचार्य अत्रे रंगमंदिर येथे पाऊस नसतानाही महिन्यातून अनेकदा बाजारपेठेत सांडपाणी साचत असते. त्यामुळे तेथील व्यापारीवर्ग, नागरिक व पादचाऱ्यांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.
मागील दोन वर्षांपासून या विषयांसंदर्भात मनसेचे शाखा अध्यक्ष संदीप पंडित हे पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत; मात्र निधी उपलब्ध नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. अखेर याबाबत त्यांनी शहर अभियंता अनिता परदेशी यांना बंदिस्त गटारे नव्याने बांधून देण्याबाबत विनंती केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.