रेल्वे उड्डाणपुलावर जीवघेणे खड्डे
दास्तान-चिर्ले रेल्वे उड्डाणपुलावर जीवघेणे खड्डे
वाहनचालकांमधून संताप
उरण, ता. १२ (वार्ताहर) : तालुक्यातील चिर्ले-दास्तान रेल्वे उड्डाणपुलावर मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याचा दर्जा चांगला नसल्याने या ठिकाणी खड्डे पडले असून, अपघाताची भीती वर्तविली जात आहे.
उरण पूर्व विभागातील दिघोडे-चिरनेर परिसरातील नागरिकांच्या दृष्टीने हा उड्डाणपूल अतिशय महत्त्वाचा आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल आणि उरणला जाण्यासाठी हा मार्ग पूर्व भागातील लोकांना सोयीस्कर आहे. उरण परिसरात मालवाहतूक रेल्वे सुरू झाल्यापासून चिर्ले आणि दास्तानदरम्यानच्या मार्गावर रेल्वे विभागाने वाहनांचा आणि रेल्वेचा अपघात होऊ नये म्हणून फाटक बांधले. मात्र जेएनपीएतून येणाऱ्या रेल्वेची संख्या अधिक असल्यामुळे या फाटकाजवळ वाहनांचा मोठा खोळंबा होत होता. या वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी चिर्ले ते दास्तान असा दीड किलोमीटरचा रेल्वे उड्डाणपूल उभारण्यात आला. ऑगस्ट २०२३ रोजी या उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात आले. सुमारे ४७ कोटी रुपये यासाठी खर्च करण्यात आले आहेत. दरम्यान, या पुलाला मोठे खड्डे पडल्याने अपघाताची भीती वर्तविली जात असून, प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या कामाच्या सुमार दर्जाबद्दल शंकाही व्यक्त केली जात आहे.
खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. सध्या सेवा रस्त्याचे काम चालू आहे. उड्डाणपुलावरील ही खड्डे दुरुस्त करण्याचे काम पूर्ण करून घेतले जाईल.
- प्रकाश धस, उपअभियंता, ठाणे खाडी पूल विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.