एमआयडीसीत गढूळ पाण्याचा पुरवठा
एमआयडीसी भागात गढूळ पाण्याचा पुरवठा
कल्याण, ता. १२ ( वार्ताहर) : डोंबिवली एमआयडीसी निवासी भागात गढूळ पाणी येत असल्याने नागरिक संतापले असून, आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शुक्रवारी (ता. ११) दुपारी मिलापनगरमधील वसंत छेडा आणि इतर काही भागांत गढूळ, अस्वच्छ, दुर्गंधीयुक्त पाणी आले. याबाबत समाजमाध्यमावर पोस्ट करीत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. काहींनी ही बाब एमआयडीसीला कळविली.
मिलापनगरमधील बहुतेक घरांमध्ये एमआयडीसी जलवाहिनीतून जोडण्या घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे ते पाणी टाकीत न जाता डायरेक्ट घरात किचनमध्ये येत असते. ते पाणी रहिवासी पिण्यासाठी आणि अन्नपदार्थ बनवण्यासाठी वापरतात. परंतु हे पाणी गढूळ असल्याने नागरिकांपुढे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. आधीच डेंगी, मलेरिया, टायफॉइड, कावीळच्या आजारांमुळे नागरिक भयभीत व त्रस्त झाले आहेत.
गढूळ पाणी आल्याने काही रहिवाशांनी पाणी विकत आणून आपली गरज भागविली. सध्या एमआयडीसी निवासी भागात नवीन नाले, गटारे आणि भूमिगत सांडपाणी वाहिन्यांची कामे जोरात सुरू आहेत. त्यामुळे खोदकाम करताना जलवाहिन्या नादुरुस्त होत आहेत. त्यामुळे पावसाचे आणि उघड्या गटारातील पाणी मिसळले जात असावे. तसेच काही ठिकाणी पाण्याच्या भूमिगत वाहिन्यांना काम करताना धक्के बसल्याने गळती लागत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.